India Mornings
India Morning
global_news_portal
loading_ticker
News• 22 April 2026•25 views

उष्णतेच्या वाढत्या संकटावर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारची पुढाकार; आयआयएम नागपूरमध्ये नवे संशोधन केंद्र सुरू

P
Puja Nitnaware
Published in General
Threads
उष्णतेच्या वाढत्या संकटावर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारची पुढाकार; आयआयएम नागपूरमध्ये नवे संशोधन केंद्र सुरू

राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमान आणि हवामान बदलाच्या परिणामांचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ठोस पाऊल उचलले आहे.

नागपूर : राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमान आणि हवामान बदलाच्या परिणामांचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ठोस पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आयआयएम नागपूर येथे ‘हीट रेझिलियन्स अँड सस्टेनेबल कूलिंग’ उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. सह्याद्री अतिथीगृहातून ऑनलाइन माध्यमातून हा कार्यक्रम पार पडला.

हे अत्याधुनिक केंद्र राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेशी संलग्न राहून उष्णतेच्या लाटा, तापमानवाढ आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांवर संशोधन व उपाययोजना विकसित करणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला बसत असून, लहान शेतकरी विशेषतः अडचणीत सापडत आहेत. विदर्भासारख्या भागात तापमानात झालेल्या वाढीमुळे शाळा बंद ठेवण्याची वेळ आली आहे. अवकाळी पाऊस, गारपीट आणि उष्णतेच्या तीव्र लाटांमुळे जनजीवन विस्कळीत होत आहे.

या केंद्राच्या माध्यमातून ‘उष्णता कृती आराखडा’ आणि ‘शहरी हवामान कृती योजना’ अधिक प्रभावीपणे राबविण्यावर भर दिला जाणार आहे. निवडक शहरांना आणि जिल्ह्यांना तांत्रिक मदत देऊन उष्णतेशी लढण्याची क्षमता वाढवली जाणार आहे.

तसेच, या योजनांची अंमलबजावणी सक्षमपणे व्हावी यासाठी आरोग्य यंत्रणा, प्रशासन आणि नागरिकांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. उष्णतेतही कमी वीज वापरून थंडावा मिळावा यासाठी बांधकाम क्षेत्रात पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि साहित्य वापरण्यालाही प्रोत्साहन दिले जाईल.

राज्य शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करत असून, ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी होण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Tags:#Heat crisis#IIM Nagpur#Research center launched#Nagpur news#Maharashtra news

want_grow

partner_desc

contact_ads
Email: indiamorning01@gmail.com

recommended

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

14 Jan 2026
64
read_more →

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

19 Jan 2026
139
read_more →

नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरचा पुन्हा दमदार पराक्रम; ‘डबल महाराष्ट्र केसरी’चा किताब पटकावला

पुण्यातील वाघोली येथे पार पडलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव करत मानाची ‘महाराष्ट्र केसरी’ चांदीची गदा जिंकली.

23 Mar 2026
29
read_more →
ad_contact_text indiamorning01@gmail.com
India Mornings

India Morning News Let's begin the day, the informed way!

✉ indiamorning01@gmail.com
Threads

Categories

▶ Astha▶ Breaking News▶ Business▶ Crime▶ Editorial▶ Education▶ English▶ Entertainment▶ Health▶ Hindi▶ International▶ Lifestyle▶ Maharashtra▶ Marathi▶ Mumbai▶ Nashik▶ National▶ News▶ Politics▶ Pune▶ Rashi bhavishya▶ Sports▶ Vidharbha▶ weather

Recent Posts

Opposition moves to remove Chief EC Gyanesh Kumar , alleges Bias

📅 April 24, 2026

Heatwave grips Nation, Early Monsoon brings good news

📅 April 24, 2026
Copyright © 2026 India Morning. All Rights Reserved.