ad_contact_text indiamorning01@gmail.com
India Mornings

India Morning News Let's begin the day, the informed way!

✉ indiamorning01@gmail.com
Threads

Categories

▶ Astha▶ Breaking News▶ Business▶ Crime▶ Editorial▶ Education▶ English▶ Entertainment▶ Health▶ Hindi▶ International▶ Lifestyle▶ Maharashtra▶ Marathi▶ Mumbai▶ Nashik▶ National▶ News▶ Politics▶ Pune▶ Rashi bhavishya▶ Sports▶ Vidharbha▶ weather

Recent Posts

Rajkiran Barve takes steps to dolve Flood problems in Yerakheda

📅 April 25, 2026

5 मई के बाद रात 1 बजे भी सुरक्षित निकल सकेंगी महिलाएं: अमित शाह का ममता बनर्जी पर हमला

📅 April 25, 2026
Copyright © 2026 India Morning. All Rights Reserved.
India Mornings
India Morning
global_news_portal
loading_ticker
News• 10 March 2026•27 views

सायबर फसवणुकीवर नियंत्रण कुठे? २००० कोटी खर्चावर विकास ठाकरेंनी सरकारला फटकारले

R
Rutuja
Published in General
Threads
सायबर फसवणुकीवर नियंत्रण कुठे? २००० कोटी खर्चावर विकास ठाकरेंनी सरकारला फटकारले

सायबर फसवणुकीवर नियंत्रणासाठी खर्च झालेल्या २००० कोटींचा हिशेब काय, असा सवाल आमदार विकास ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केला.

नागपूर :राज्यात वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम नागपूरचे आमदार आणि नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सायबर गुन्ह्यांमधून फसवणूक झालेल्या रकमेपैकी केवळ २ टक्केच रक्कम परत मिळत असल्याची बाब गंभीर असल्याचे सांगत, या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी खर्च करण्यात आलेल्या सुमारे २,००० कोटी रुपयांचा नेमका उपयोग काय झाला, असा सवाल त्यांनी केला.

मुंबईत सुरू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करताना ठाकरे म्हणाले की, राज्यात दररोज अनेक नागरिक सायबर फसवणुकीचे बळी ठरत आहेत. मात्र अशा प्रकरणांत पीडितांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्याचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

सायबर गुन्हे रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात आला असल्याचे सांगितले जाते. मात्र त्याचा ठोस परिणाम नागरिकांना का जाणवत नाही, असा प्रश्न उपस्थित करत ठाकरे यांनी सरकारकडून स्पष्ट उत्तराची मागणी केली.

दरम्यान, यावर उत्तर देताना संबंधित मंत्र्यांनी राज्यातील नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती वाढवण्यासाठी दर महिन्याला सुमारे २१ कोटी संदेश पाठविण्याची योजना राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच जागरूकता मोहिमेसाठी ३४ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

यावेळी ठाकरे यांनी केवळ ‘गोल्डन अवर’ची घोषणा करून प्रश्न सुटणार नाही, असे स्पष्ट केले. सायबर फसवणूक होण्यापूर्वीच नागरिकांना सतर्क करणारी रिअल-टाइम अलर्ट प्रणाली, जलद तपास प्रक्रिया आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने गुन्हेगारांपर्यंत त्वरित पोहोचणारी यंत्रणा उभारणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.जनतेचा कष्टाचा पैसा सुरक्षित ठेवणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे सांगत सायबर गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही ठाकरे यांनी केली.

Tags:#Cyber fraud Maharashtra##Vikas Thakre Statement#Maharashtra Cyber Crime Issue#Nagpur Congress News#Cyber Fraud Money Recovery India

want_grow

partner_desc

contact_ads
Email: indiamorning01@gmail.com

recommended

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

19 Jan 2026
140
read_more →

First-Ever Sunday Budget: Sitharaman to Present on Feb 1

Finance Minister Nirmala Sitharaman will present the Union Budget 2026-27 on Sunday, February 1, marking the first-ever Sunday budget in India.

9 Jan 2026
83
read_more →

High alert after Trump’s warning, Americans told to leave 14 Nations

Fighting between the United States and Iran has become very serious.

3 Mar 2026
34
read_more →