India Mornings
India Morning
Global News Portal
Thursday, February 19, 2026
Loading latest news...
News19 February 20263 views

रोहित पवार यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर; सुप्रिया सुळे यांची सरकारकडे ठाम मागणी

P
Puja Nitnaware
Published in General
रोहित पवार यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर; सुप्रिया सुळे यांची सरकारकडे ठाम मागणी

बारामतीतील विमान अपघातानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार गट) कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी आमदार रोहित पवार यांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

मुंबई: बारामतीतील विमान अपघातानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार गट) कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी आमदार रोहित पवार यांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. रोहित पवार यांनी अपघातासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे त्यांना संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे राज्य सरकारने तातडीने सुरक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

सुळे यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया माध्यमावरून सरकारला थेट आवाहन करत, लोकप्रतिनिधींना निर्भयपणे मत मांडता यावे यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले.

अपघातानंतर संशयाचे सावट-

२८ जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह चार जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर अपघाताच्या कारणांबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.

रोहित पवार यांनी सलग पत्रकार परिषदांमधून या अपघातात काही अनियमितता असू शकते, असा संशय व्यक्त केला आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

पारदर्शक चौकशीची अपेक्षा-

सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, या दुर्घटनेविषयी जनतेच्या मनात अनेक प्रश्न आहेत. चौकशी प्रक्रियेत विलंब किंवा माहितीचा अभाव राहिल्यास लोकांमध्ये अविश्वास निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संपूर्ण घटनेची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी होणे आवश्यक आहे.

त्याचबरोबर, रोहित पवार हे जनतेच्या शंका आणि भावना पुढे मांडत आहेत. अशा परिस्थितीत त्यांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही राज्य सरकारची कर्तव्य आहे, असे सांगत सुळे यांनी सरकारने तत्काळ योग्य ती पावले उचलावीत, असा इशारा दिला.

Tags:#Supriya Sule firm demand Rohit Pawar's security issue

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

Jan 14, 2026
38
Read More →

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
88
Read More →

झाडावरुन पडला कामगार, पोटाला चिरून निघाली लोखंडी अँगल

तुमसर तालुक्यातील माडगी येथील CBSE शाळेत झाडावरून पडून कामगाराच्या पोटाला लोखंडी अँगल चिरली. प्रकृती गंभीर.

Feb 10, 2026
20
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com
रोहित पवार यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर; सुप्रिया सुळे यांची सरकारकडे ठाम मागणी - India Morning