India Mornings
India Morning
Global News Portal
Saturday, February 21, 2026
Loading latest news...
News21 February 20266 views

संजय राऊतांनी व्यक्त केली दिलगिरी; दादा भुसे यांच्यासोबत न्यायालयात हजेरी, वादावर पडदा

R
Rutuja
Published in General
संजय राऊतांनी व्यक्त केली दिलगिरी; दादा भुसे यांच्यासोबत न्यायालयात हजेरी, वादावर पडदा

संजय राऊतांनी दादा भुसे यांच्यावरील आरोपांबाबत दिलगिरी व्यक्त केली. अब्रुनुकसानीचा खटला मागे; न्यायालयात दोघांची संयुक्त उपस्थिती.

मालेगाव : गिरणा सहकारी साखर कारखान्यातील कथित १७८ कोटींच्या शेअर्स घोटाळ्याच्या आरोपांवरून रंगलेला वाद अखेर निवळला आहे. संजय राऊत यांनी व्यक्त केलेल्या आरोपांमुळे निर्माण झालेल्या प्रकरणात दादा भुसे यांनी दाखल केलेला अब्रुनुकसानीचा खटला मागे घेतला असून, दोन्ही नेते आज प्रथमच एकत्र माध्यमांसमोर आले.

गिरणा सहकारी साखर कारखान्याच्या व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. त्यांचा थेट निशाणा मंत्री दादा भुसे यांच्यावर होता. या आरोपांमुळे व्यथित झालेल्या भुसे यांनी मालेगावच्या अतिरिक्त मुख्य न्यायादंडाधिकाऱ्यांकडे अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. मागील सुनावणीत राऊत अनुपस्थित राहिल्याने न्यायालयाने त्यांना १२ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.मात्र आजच्या सुनावणीत दोन्ही नेते न्यायालयात हजर झाले. यावेळी भुसे यांनी खटला मागे घेतल्याची घोषणा केली आणि त्यामुळे राऊत यांना मोठा दिलासा मिळाला.

माध्यमांसमोर एकत्रित उपस्थिती-

२०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेनंतर प्रथमच शिंदेसेनेचे नेते आणि राऊत एकत्र दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.

यावेळी राऊत म्हणाले, दादा भुसे आणि आमच्यातील वाद संपला आहे. ज्यांच्या माहितीनुसार मी वक्तव्य केले होते, ते आता सत्ताधारी पक्षात गेले आहेत. त्यामुळे या विषयावर पुढे वाद घालण्यात अर्थ नाही. माझ्याकडून चुकीच्या माहितीच्या आधारे वक्तव्य झाले, हे कालांतराने लक्षात आले. दादा भुसे यांनी मोठेपणा दाखवत हा विषय संपवण्यासाठी सहकार्य केले.राऊत यांनी तब्येतीच्या कारणामुळे न्यायालयीन तारखांना उपस्थित राहणे अवघड होत असल्याचेही नमूद केले.

‘सभासद शेतकऱ्यांचा अवमान’-

दादा भुसे यांनी सांगितले की, गिरणा साखर कारखान्याच्या व्यवहाराबाबत दैनिकातील बातम्यांमुळे मालेगाव व परिसरातील ११ हजार सभासद शेतकऱ्यांचा अवमान झाला. कारखाना विक्री प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांनी ११०० रुपये प्रति शेअर प्रमाणे भांडवल उभारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अफवांमुळे अपेक्षित रक्कम जमा होऊ शकली नाही.

जमा झालेली १.७८ कोटी रुपयांची रक्कम संबंधित कंपनीला आरटीजीएसद्वारे हस्तांतरित केल्याचे सर्व व्यवहार नोंदीवर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“राऊत यांनी मालेगावच्या शेतकरी सभासदांची माफी मागितली आहे. त्यांच्या दिलगिरीनंतर आणि तब्येतीचा विचार करून आम्ही खटला मागे घेतला,” असे भुसे यांनी सांगितले.या घडामोडींमुळे गेल्या काही महिन्यांपासून गाजत असलेल्या या वादावर अखेर पडदा पडला असून, दोन्ही बाजूंनी समेटाचा सूर लावल्याने राजकीय वातावरणात वेगळीच चर्चा रंगली आहे.

Tags:#Sanjay Raut#Dada Bhuse#Girna Sugar Factory#Defamation case#Malegaon Court

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

Jan 14, 2026
38
Read More →

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
90
Read More →

First-Ever Sunday Budget: Sitharaman to Present on Feb 1

Finance Minister Nirmala Sitharaman will present the Union Budget 2026-27 on Sunday, February 1, marking the first-ever Sunday budget in India.

Jan 9, 2026
58
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com