India Mornings
India Morning
Global News Portal
Monday, February 23, 2026
Loading latest news...
News23 February 202610 views

पाकिस्तानात डाळींचा तुटवडा; आयातीवर वाढलेले अवलंबित्व सरकारसमोर मोठे आव्हान

R
Rutuja
Published in General
पाकिस्तानात डाळींचा तुटवडा; आयातीवर वाढलेले अवलंबित्व सरकारसमोर मोठे आव्हान

पाकिस्तानात डाळींचा तीव्र तुटवडा; वार्षिक १०.७ लाख टन आयात. आर्थिक संकटात सरकारसमोर मोठे आव्हान.

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये सध्या डाळींचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या या देशासमोर आता अन्नधान्याचे संकट उभे ठाकले आहे. पंतप्रधान शहाबाज शरीफ यांच्या सरकारसमोर ही मोठी डोकेदुखी ठरत आहे.

पाकिस्तानची अर्थव्यवस्था कमकुवत असल्यामुळे देशाला वारंवार International Monetary Fund कडून कर्ज घ्यावे लागते. अशा परिस्थितीत डाळींच्या उत्पादनात सातत्याने घट होत असल्याने सरकारची चिंता वाढली आहे.माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये दरवर्षी सुमारे १६.२ लाख टन डाळ लागते. त्यापैकी सुमारे १०.७ लाख टन डाळ परदेशातून आयात करावी लागते. म्हणजेच बहुतांश गरज आयातीवर भागवावी लागते. यासाठी दरवर्षी जवळपास ९८ कोटी डॉलर खर्च केले जातात.

१९९८ पूर्वी पाकिस्तान डाळ निर्यात करणारा देश होता. मात्र नंतरच्या काळात तत्कालीन राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांच्या कार्यकाळात डाळींच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली. त्यानंतर शेतकऱ्यांना डाळीचे पीक घेणे परवडेनासे झाले आणि उत्पादन घटत गेले.तज्ज्ञांच्या मते, डाळ ही लोकांच्या पोषणासाठी महत्त्वाची आहेच, पण जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठीही उपयोगी ठरते. मात्र योग्य धोरणे आणि प्रोत्साहन नसल्याने शेतकरी इतर पिकांकडे वळत आहेत.आता या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तान सरकार काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags:#Pakistan news#Pulse Shortage#Shahbaz Sharif#IMF#Food crisis

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

Jan 14, 2026
40
Read More →

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
90
Read More →

झाडावरुन पडला कामगार, पोटाला चिरून निघाली लोखंडी अँगल

तुमसर तालुक्यातील माडगी येथील CBSE शाळेत झाडावरून पडून कामगाराच्या पोटाला लोखंडी अँगल चिरली. प्रकृती गंभीर.

Feb 10, 2026
21
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com