India Mornings
India Morning
Global News Portal
Tuesday, March 3, 2026
Loading latest news...
News20 February 202664 views

परीक्षा नाही, थेट रेल्वेत नोकरी; ५३४९ अप्रेंटिस पदांसाठी भरती, अर्ज प्रक्रिया सुरू

P
Puja Nitnaware
Published in General
परीक्षा नाही, थेट रेल्वेत नोकरी; ५३४९ अप्रेंटिस पदांसाठी भरती, अर्ज प्रक्रिया सुरू

रेल्वेत करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. Western Railway अंतर्गत ५३४९ अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई : रेल्वेत करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. Western Railway अंतर्गत ५३४९ अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती Railway Recruitment Cell मार्फत केली जाणार असून इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया २१ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणार असून २३ मार्च २०२६ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांकडे अर्ज करण्यासाठी सुमारे एक महिन्याचा कालावधी उपलब्ध आहे.

परीक्षा नाही; मेरिटवर निवड-

या अप्रेंटिस पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड शैक्षणिक गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार करून केली जाईल. त्यानंतर कागदपत्र पडताळणीद्वारे अंतिम निवड होणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षाचा असेल.

पात्रता काय?

उमेदवार किमान १२वी उत्तीर्ण असावा.

संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय (ITI) प्रमाणपत्र आवश्यक आहे.

फिटर, वेल्डर, टर्नर, मॅकेनिस्ट, वायरमन, पाइप फिटर, प्लंबर, स्टेनोग्राफर आदी ट्रेडसाठी पदे उपलब्ध आहेत.

इंजिनियरिंग पदवी किंवा डिप्लोमा धारक उमेदवारही अर्ज करू शकतात.

अर्ज कसा करावा?

अधिकृत संकेतस्थळ www.rrc-wr.com वर भेट द्या.

प्रथम नोंदणी (Registration) प्रक्रिया पूर्ण करा.

आधार नोंदणीसह आवश्यक वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरा.

सर्व तपशील तपासून अर्ज सबमिट करा.

अर्जाची प्रिंटआउट भविष्यासाठी जतन करून ठेवा.

सरकारी विभागात करिअरची सुरुवात करण्यासाठी ही उत्तम संधी मानली जात आहे. रेल्वे क्षेत्रात प्रत्यक्ष काम शिकत अनुभव मिळवण्याची संधी या भरतीमुळे तरुणांना उपलब्ध होणार आहे. इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags:#No exam#Direct job#Western Railway#Recruitment#Mumbai news

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

Jan 14, 2026
43
Read More →

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
97
Read More →

झाडावरुन पडला कामगार, पोटाला चिरून निघाली लोखंडी अँगल

तुमसर तालुक्यातील माडगी येथील CBSE शाळेत झाडावरून पडून कामगाराच्या पोटाला लोखंडी अँगल चिरली. प्रकृती गंभीर.

Feb 10, 2026
22
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com