India Mornings
India Morning
Global News Portal
Tuesday, March 3, 2026
Loading latest news...
News28 February 202642 views

लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांवरून जळगावात गोंधळ; E-KYC करूनही पैसे न मिळाल्याने महिलांचा संताप

P
Puja Nitnaware
Published in General
लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांवरून जळगावात गोंधळ; E-KYC करूनही पैसे न मिळाल्याने महिलांचा संताप

राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये मानधन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या योजनेला सुरुवातीला मोठा प्रतिसाद मिळाला होता.

जळगाव : राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये मानधन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या योजनेला सुरुवातीला मोठा प्रतिसाद मिळाला होता. अर्ज मंजूर झाल्यानंतर अनेक महिलांच्या खात्यात रक्कम जमा झाली; मात्र नंतर अर्जांची सखोल छाननी आणि ई-केवायसीची अट लागू करण्यात आली.

दरम्यान, ई-केवायसी पूर्ण करूनही हप्ते जमा होत नसल्याची तक्रार अनेक महिलांनी केली आहे. जळगाव येथे महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयात याच मुद्द्यावरून महिलांनी गर्दी करत संताप व्यक्त केला. आपली समस्या मांडण्यासाठी गेलेल्या महिलांना समाधानकारक उत्तर न मिळाल्याचा आरोप करण्यात आला. उलट कर्मचाऱ्यांनी अरेरावी केल्याचेही काही महिलांचे म्हणणे आहे.

गोंधळ वाढत असल्याचे लक्षात येताच कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी महिलांना बाहेर काढत मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावल्याची घटना घडली. सुमारे दोन तास हा प्रकार सुरू होता. संतप्त महिलांनी आपली व्यथा मांडणारे व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केले असून ते व्हायरल होत आहेत.

जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून महिलांनी कार्यालयात धाव घेतली होती. गेल्या काही महिन्यांपासून ई-केवायसी करूनही हप्ते मिळत नसल्याची ओरड सुरू असल्याने प्रशासनाने याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी महिलांकडून करण्यात येत आहे.

Tags:#Ladki Bhahin Yojana#Women angry#e-KYC#Jalgaon news#Maharashtra news

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

Jan 14, 2026
43
Read More →

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
99
Read More →

झाडावरुन पडला कामगार, पोटाला चिरून निघाली लोखंडी अँगल

तुमसर तालुक्यातील माडगी येथील CBSE शाळेत झाडावरून पडून कामगाराच्या पोटाला लोखंडी अँगल चिरली. प्रकृती गंभीर.

Feb 10, 2026
22
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com
लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांवरून जळगावात गोंधळ; E-KYC करूनही पैसे न मिळाल्याने महिलांचा संताप - India Morning