India Mornings
India Morning
Global News Portal
Tuesday, March 10, 2026
Loading latest news...
News10 March 202611 views

जागतिक तणावामुळे तेल बाजार अस्थिर; भारताकडे सुमारे ४००० कोटी लिटर कच्च्या तेलाचा साठा

R
Rutuja
Published in General
जागतिक तणावामुळे तेल बाजार अस्थिर; भारताकडे सुमारे ४००० कोटी लिटर कच्च्या तेलाचा साठा

मध्यपूर्वेतील तणाव वाढत असताना भारताकडे सुमारे ४००० कोटी लिटर कच्च्या तेलाचा साठा असून तो देशाच्या गरजांसाठी ७–८ आठवडे पुरू शकतो.

नवी दिल्ली : मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाचा परिणाम आता जागतिक तेल बाजारावर दिसू लागला आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिकेमधील संघर्ष तीव्र होत असताना कच्च्या तेलाच्या दरांमध्ये मोठी चढ-उतार सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतासारख्या तेल आयातीवर अवलंबून असलेल्या देशांची चिंता वाढली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढले होते. एका टप्प्यावर प्रति पिंप ११५ डॉलरपर्यंत गेलेले दर सध्या सुमारे ८५ डॉलरच्या आसपास आहेत. मात्र तणाव कायम राहिल्यास भविष्यात दर १५० ते २०० डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.भारत आपल्या गरजेपैकी सुमारे ९० टक्के कच्चे तेल परदेशातून आयात करतो. यापैकी जवळपास निम्मा पुरवठा आखाती देशांकडून होतो. त्यामुळे त्या भागातील कोणताही संघर्ष भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वाचा ठरतो.

भारताकडे सध्या अंदाजे २५० दशलक्ष बॅरल कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांचा राखीव साठा आहे. लिटरमध्ये मोजल्यास हा साठा सुमारे ४००० कोटी लिटर इतका आहे. हा साठा देशाच्या गरजेनुसार साधारण सात ते आठ आठवडे पुरेल, असे मानले जाते.गेल्या दशकात भारताने तेल आयातीचे स्रोत वाढवले आहेत. पूर्वी सुमारे २७ देशांकडून तेल खरेदी केले जात होते, तर आता जवळपास ४० देशांकडून कच्चे तेल आयात केले जाते. रशिया, अमेरिका, पश्चिम आफ्रिका आणि मध्य आशियातील काही देशांकडूनही भारत मोठ्या प्रमाणावर तेल घेत आहे.

जगातील सुमारे २० टक्के कच्च्या तेलाची वाहतूक होर्मुझ सामुद्रधुनीतून होते. भारताचे सुमारे ४० टक्के तेल या मार्गाने येते. त्यामुळे या समुद्री मार्गावरील तणाव वाढल्यास जागतिक पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो.कच्चे तेल हे केवळ इंधनापुरते मर्यादित नसून सुमारे सहा हजार वस्तू तयार करण्यासाठी त्याचा वापर होतो. पेट्रोल, डिझेल, विमान इंधन, द्रवित वायू, रॉकेल यांसारख्या इंधनांबरोबरच प्लास्टिक, कृत्रिम धागे, औषधोपचारासाठी लागणाऱ्या अनेक वस्तू तसेच सौंदर्यप्रसाधने तयार करण्यासाठीही कच्च्या तेलाचा वापर होतो.

म्हणूनच कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली तर त्याचा परिणाम अनेक वस्तूंच्या किमतींवर होऊन महागाई वाढण्याची शक्यता असते. तज्ज्ञांच्या मते, मध्यपूर्वेतील संघर्ष लांबला तर त्याचा थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि महागाईवर होऊ शकतो.

Tags:#India Crude Oil Reserve#Global Oil Market Tension#Iran Israel Conflict Oil Impact#Middle East Oil Supply#Crude Oil Price Rise

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

Jan 14, 2026
49
Read More →

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
112
Read More →

झाडावरुन पडला कामगार, पोटाला चिरून निघाली लोखंडी अँगल

तुमसर तालुक्यातील माडगी येथील CBSE शाळेत झाडावरून पडून कामगाराच्या पोटाला लोखंडी अँगल चिरली. प्रकृती गंभीर.

Feb 10, 2026
28
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com