India Mornings
India Morning
Global News Portal
Tuesday, March 10, 2026
Loading latest news...
News10 March 20269 views

फेक खात्यांवर लगाम घालण्यासाठी सरकार सज्ज; देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा

R
Rutuja
Published in General
फेक खात्यांवर लगाम घालण्यासाठी सरकार सज्ज; देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा

फेक सोशल मीडिया खात्यांवर लगाम घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत विशेष समिती स्थापन करण्याची घोषणा केली.

मुंबई : समाजमाध्यमांवर बनावट खात्यांच्या माध्यमातून पसरवली जाणारी बदनामी, खोटी माहिती आणि चिथावणीखोर मजकूर रोखण्यासाठी राज्य सरकार कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत या संदर्भात महत्त्वाची माहिती देत विशेष समिती स्थापन करण्याचा

निर्णय जाहीर केला.

समाजमाध्यमांवरील गैरवापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय समिती नेमण्यात येणार आहे. ही समिती विद्यमान कायद्यांचा आढावा घेऊन त्यात बदल करण्याची आवश्यकता आहे का किंवा स्वतंत्र कायदा करणे गरजेचे आहे का, याचा सखोल अभ्यास करून सरकारला अहवाल देणार आहे.

आमदार राहुल कुल यांनी उपस्थित केला प्रश्न

प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान भाजपचे आमदार राहुल कुल यांनी हा मुद्दा सभागृहात मांडला. समाजमाध्यमांवर काही गट बनावट खात्यांच्या माध्यमातून व्यक्ती आणि लोकप्रतिनिधींविरोधात बदनामीकारक मोहीम राबवत असल्याचा आरोप त्यांनी केला. अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवत अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार कोणती पावले उचलणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

सरकारची भूमिका स्पष्ट-

यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, समाजमाध्यमांचा वाढता वापर लक्षात घेता त्याचा गैरवापर रोखण्यासाठी प्रभावी कायदेशीर व्यवस्था आवश्यक आहे. त्यामुळे पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून योग्य कायदेशीर उपाययोजना सुचवण्याचे काम केले जाईल.

गेल्या काही काळात समाजमाध्यमांवरून अफवा, द्वेषपूर्ण संदेश आणि खोट्या माहितीचा प्रसार वाढल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे समाजात तणाव निर्माण होण्याची भीती व्यक्त होत असून बनावट खात्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही सातत्याने होत आहे.

Tags:#Devendra Fadnavis Statement#Fake Social Media Accounts Maharashtra#Social Media Misuse India#Maharashtra Assembly News#Rahul Kul BJP MLA

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

Jan 14, 2026
49
Read More →

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
112
Read More →

झाडावरुन पडला कामगार, पोटाला चिरून निघाली लोखंडी अँगल

तुमसर तालुक्यातील माडगी येथील CBSE शाळेत झाडावरून पडून कामगाराच्या पोटाला लोखंडी अँगल चिरली. प्रकृती गंभीर.

Feb 10, 2026
28
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com