India Mornings
India Morning
Global News Portal
Friday, February 20, 2026
Loading latest news...
News20 February 202610 views

भारत-बांगलादेश संबंधात तणाव? तारिक रहमान सरकारचा स्पाइसजेटवर हवाई निर्बंधांचा निर्णय

R
Rutuja
Published in General
भारत-बांगलादेश संबंधात तणाव? तारिक रहमान सरकारचा स्पाइसजेटवर हवाई निर्बंधांचा निर्णय

बांगलादेश सरकारने स्पाइसजेटला हवाई क्षेत्र वापरास तात्पुरती मनाई केली. भारत-बांगलादेश संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता.

ढाका/नवी दिल्ली : बांगलादेशात सत्तांतर झाल्यानंतर तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारकडून भारताशी संबंध अधिक मजबूत होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे दोन्ही देशांतील राजनैतिक वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

बांगलादेश सरकारने भारतीय बजेट विमान कंपनी SpiceJet ला त्यांच्या हवाई क्षेत्राचा वापर करण्यास तात्पुरती मनाई केली आहे. या निर्णयाचा परिणाम विशेषतः कोलकाता–गुवाहाटी मार्गावरील काही उड्डाणांवर होत असून, विमानांना आता पर्यायी आणि अधिक लांब मार्ग स्वीकारावा लागत आहे. त्यामुळे इंधनखर्च आणि प्रवासाचा कालावधी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, नेव्हिगेशन शुल्कासह काही प्रलंबित देयकांबाबतचा वाद या कारवाईमागे कारणीभूत असू शकतो. थकबाकीची अचूक रक्कम अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. दरम्यान, स्पाइसजेटच्या प्रवक्त्यांनी सांगितले की संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्याने संवाद सुरू असून लवकरच तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या कंपनीची उड्डाणे नियमानुसार सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही वर्षांत भारत-बांगलादेश संबंधांनी सकारात्मक वळण घेतले होते. व्यापार, सीमाव्यवस्थापन आणि वाहतूक सहकार्याच्या क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये प्रगती दिसून येत होती. अशा पार्श्वभूमीवर घेतलेल्या या निर्णयामुळे भविष्यातील द्विपक्षीय समीकरणांवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags:#भारत-बांगलादेश संबंध#स्पाइसजेट#बांगलादेश सरकार#तारिक रहमान#हवाई निर्बंध

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

Jan 14, 2026
38
Read More →

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
90
Read More →

झाडावरुन पडला कामगार, पोटाला चिरून निघाली लोखंडी अँगल

तुमसर तालुक्यातील माडगी येथील CBSE शाळेत झाडावरून पडून कामगाराच्या पोटाला लोखंडी अँगल चिरली. प्रकृती गंभीर.

Feb 10, 2026
20
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com
भारत-बांगलादेश संबंधात तणाव? तारिक रहमान सरकारचा स्पाइसजेटवर हवाई निर्बंधांचा निर्णय - India Morning