India Mornings
India Morning
Global News Portal
Wednesday, March 25, 2026
Loading latest news...
News23 March 202650 views

महाराष्ट्रासह १५ राज्यांना हवामानाचा इशारा; वादळी पावसाचा ‘हाय अलर्ट’, पश्चिम महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता!

P
Puja Nitnaware
Published in General
महाराष्ट्रासह १५ राज्यांना हवामानाचा इशारा; वादळी पावसाचा ‘हाय अलर्ट’, पश्चिम महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता!

हवामान विभागाने महाराष्ट्रासह देशातील १५ राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे.

मुंबई: हवामान विभागाने महाराष्ट्रासह देशातील १५ राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा आणि वातावरणातील वाढलेली आर्द्रता यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून अनेक भागांत अचानक हवामान बदलत आहे.

राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांत पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याचदरम्यान पश्चिम महाराष्ट्रात गारपिटीचा धोका वाढला असून पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या अवकाळी पावसामुळे द्राक्ष, डाळिंब तसेच काढणीला आलेल्या गहू आणि ज्वारी पिकांना मोठा फटका बसण्याची भीती आहे.

दरम्यान, राज्यात सध्या दुहेरी हवामान परिस्थिती पाहायला मिळत आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव आणि बीड या जिल्ह्यांमध्ये काही भागांत पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे, तर कोकण आणि किनारपट्टी भागात उष्णतेची लाट जाणवत आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी येथे तापमान ३६ ते ३७ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

महाराष्ट्राबरोबरच देशातील इतर राज्यांमध्येही हवामान बिघडले आहे. राजस्थान, हरियाणा आणि पंजाबमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली (एनसीआर), उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार आणि झारखंडमध्ये विजांसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Tags:#High alert#Weather warning#Thunderstorms#Mumbai news#Maharashtra news

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

Jan 14, 2026
57
Read More →

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
121
Read More →

नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरचा पुन्हा दमदार पराक्रम; ‘डबल महाराष्ट्र केसरी’चा किताब पटकावला

पुण्यातील वाघोली येथे पार पडलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव करत मानाची ‘महाराष्ट्र केसरी’ चांदीची गदा जिंकली.

Mar 23, 2026
12
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com