India Mornings
India Morning
Global News Portal
Saturday, April 11, 2026
Loading latest news...
News11 April 20261 views

‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरण गाजत असताना वडेट्टीवारांचा सरकारवर प्रहार; दुहेरी निकषांवर सवाल

T
Tanay
Published in General
‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरण गाजत असताना वडेट्टीवारांचा सरकारवर प्रहार; दुहेरी निकषांवर सवाल

कॉर्पोरेट जिहाद प्रकरणावर वडेट्टीवारांचा सरकारवर हल्ला; दुहेरी निकषांवर सवाल, शेतकरी मुद्द्यावरही टीका.

नाशिक : राज्यात चर्चेत असलेल्या ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणासह ढोंगी बाबा अशोक खरात यांच्या अटकेनंतर राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी महायुती सरकारवर तीव्र शब्दांत टीका करत दुहेरी निकष लावले जात असल्याचा आरोप केला.

वडेट्टीवार म्हणाले, “अशोक खरात यांच्या जागी दुसऱ्या धर्मातील आरोपी असता, तर संपूर्ण समाजाला लक्ष्य करण्यात आलं असतं. गुन्हेगार कोणत्याही धर्माचा किंवा जातीचा असो, त्याच्याकडे फक्त गुन्हेगार म्हणूनच पाहिलं पाहिजे,” असे मत त्यांनी मांडले.

यासोबतच त्यांनी राज्यातील शेतकरी प्रश्नावरही सरकारला घेरले. कर्जमाफीची घोषणा ही केवळ दिखावा असल्याची टीका करत, “शेतकऱ्यांचा सात-बारा पूर्णपणे कर्जमुक्त झाल्याशिवाय खरी मदत झाल्याचं म्हणता येणार नाही,” असे ते म्हणाले.

पिक विमा योजनेवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. या योजनेचा फायदा खासगी विमा कंपन्यांनाच होत असून, आपत्तीग्रस्त शेतकरी अद्याप मदतीपासून वंचित असल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, विरोधी पक्षातील काही नेते सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांवर स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले की, “मतदारसंघाच्या विकासासाठी सत्ताधाऱ्यांना भेटणं ही नेहमीची बाब आहे.” तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर होणारे ‘वेळ देत नाहीत’ हे आरोपही त्यांनी फेटाळले.

महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता त्यांनी नाकारली असली, तरी काही खासदारांची भूमिका ही त्यांच्या वैयक्तिक निर्णयांवर आधारित असल्याचे त्यांनी सूचित केले.

Tags:#CorporateJihad Row#VijayWadettiwar##MaharashtraPolitics#DoubleStandards#FarmerIssues

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

Jan 14, 2026
62
Read More →

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
134
Read More →

नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरचा पुन्हा दमदार पराक्रम; ‘डबल महाराष्ट्र केसरी’चा किताब पटकावला

पुण्यातील वाघोली येथे पार पडलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव करत मानाची ‘महाराष्ट्र केसरी’ चांदीची गदा जिंकली.

Mar 23, 2026
24
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com