India Mornings
India Morning
Global News Portal
Tuesday, January 20, 2026
Loading latest news...
News17 January 20266 views

मुंबईत आपलाच महापौर व्हावा, हे स्वप्न;मुंबई निकालावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

R
Rutuja
Published in General
मुंबईत आपलाच महापौर व्हावा, हे स्वप्न;मुंबई निकालावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई महापालिका निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका करत मुंबईत आपलाच महापौर व्हावा, हे स्वप्न असल्याचे सांगितले.

मुंबई :मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून, या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवत २५ वर्षांपासून शिवसेना (ठाकरे गट) सत्तेत असलेला बालेकिल्ला उद्ध्वस्त केला आहे. भाजपाला ८९ जागांवर विजय मिळाला असून, शिवसेना ठाकरे गटाला ६५ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी विजयी उमेदवारांशी संवाद साधत आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका करताना शिवसेना अजून संपलेली नसल्याचा ठाम दावा केला.“भाजपला वाटत असेल की त्यांनी शिवसेना कागदावर संपवली आहे, पण शिवसेना अजूनही जमिनीवर जिवंत आहे. साम, दाम, दंड, भेद वापरून निवडणूक जिंकता येईल; पण निष्ठा कधीच विकत घेता येत नाही,” असे ठाकरे म्हणाले.

“या निवडणुकीत जे विकले गेले नाहीत, त्यांच्या चरणी मी नतमस्तक आहे. आपली जबाबदारी आता अधिक वाढली आहे. मुंबईत आपलाच महापौर व्हावा, हे माझं स्वप्न आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.पुढे बोलताना त्यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केले. “गद्दारी करून मिळवलेला हा विजय मुंबई गिळंकृत ठेवण्यासाठी आहे. त्यांनी जे पाप केलं आहे, ते मराठी माणूस कधीही माफ करणार नाही,” असा हल्लाबोल त्यांनी केला.

“आपल्याकडे पैसा नसेल, पण आपल्याकडे जी ताकद आहे, तिने विरोधकांना घाम फोडला आहे. ही शक्ती एकत्र राहिली पाहिजे, जेणेकरून पुढील पिढीला तुमचा अभिमान वाटेल,” असे आवाहन ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले.या निवडणुकीतील यश त्यांनी मराठी जनतेला समर्पित करताना, “ही लढाई आता सुरू झाली आहे. जिद्द मोठी असते. आपण पुन्हा जिंकू. एकत्र आणि मजबुतीने उभे राहा,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Tags:##BJP victory Mumbai##Mumbai mayor statement##मुंबई निकाल

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

Jan 14, 2026
18
Read More →

First-Ever Sunday Budget: Sitharaman to Present on Feb 1

Finance Minister Nirmala Sitharaman will present the Union Budget 2026-27 on Sunday, February 1, marking the first-ever Sunday budget in India.

Jan 9, 2026
32
Read More →

दूसरी बार दूल्हा बनेंगे शिखर धवन, फरवरी में सोफी शाइन से रचाएंगे विवाह

पूर्व भारतीय क्रिकेटर शिखर धवन फरवरी 2026 में गर्लफ्रेंड सोफी शाइन से दिल्ली-एनसीआर में दूसरी शादी करने जा रहे हैं।

Jan 6, 2026
55
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com