India Mornings
India Morning
Global News Portal
Saturday, March 7, 2026
Loading latest news...
News24 January 202624 views

मी चालणंही विसरले होते…; अंतराळात अडकल्यानंतर पृथ्वीवर परतल्यावरची अवस्था सांगताना सुनिता विल्यम्स भावूक

P
Puja Nitnaware
Published in General
मी चालणंही विसरले होते…; अंतराळात अडकल्यानंतर पृथ्वीवर परतल्यावरची अवस्था सांगताना सुनिता विल्यम्स भावूक

तब्बल 27 वर्षांचे उज्ज्वल करिअर, अंतराळात 608 दिवस घालवण्याचा विक्रम आणि असंख्य मोहिमा यशस्वी करणाऱ्या भारतीय वंशाच्या ज्येष्ठ अंतराळवीर कॅप्टन सुनिता विल्यम्स यांनी अंतराळवीर म्हणून निवृत्तीची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली : तब्बल 27 वर्षांचे उज्ज्वल करिअर, अंतराळात 608 दिवस घालवण्याचा विक्रम आणि असंख्य मोहिमा यशस्वी करणाऱ्या भारतीय वंशाच्या ज्येष्ठ अंतराळवीर कॅप्टन सुनिता विल्यम्स यांनी अंतराळवीर म्हणून निवृत्तीची घोषणा केली आहे. यानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी बोईंग स्टारलाइनरमधील तांत्रिक बिघाडामुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अडकून पडलेल्या 9 महिन्यांच्या कालावधीतील शारीरिक, मानसिक आणि भावनिक संघर्ष उघडपणे मांडला.

अवघ्या काही दिवसांसाठी अंतराळात गेलेल्या सुनिता विल्यम्स यांना तब्बल नऊ महिने तिथेच थांबावे लागले. त्या काळात अंतराळ स्थानकावर पूर्ण सुरक्षितता असली, तरी घरी परतण्याबाबतची अनिश्चितता हीच सर्वात मोठी मानसिक परीक्षा होती, असे त्यांनी सांगितले. दीर्घकाळ गुरुत्वाकर्षणाशिवाय राहिल्यामुळे पृथ्वीवर परतल्यानंतर शरीराने साथ देणं थांबलं होतं. “मी बसणं, झोपणं तर विसरलेच होते, पण चालायचं कसं हेही पुन्हा शिकावं लागलं,” असा धक्क

गुरुत्वाकर्षणाचा अभाव शरीरावर किती खोल परिणाम करतो, याचा अनुभव स्वतःच्या शरीरातून घेतल्याचे त्यांनी सांगितले. फिजिओथेरपी आणि सातत्यपूर्ण सरावानंतरच पुन्हा सामान्य हालचाली शक्य झाल्या, असेही त्या म्हणाल्या.

नासातील कामगिरीपलीकडे सुनिता स्वतःला अमेरिकन नौदलाची हेलिकॉप्टर पायलट आणि कट्टर प्राणीप्रेमी मानतात. त्यांच्या शरीरावरील टॅटूमागची भावनिक कहाणीही त्यांनी यावेळी उघड केली. हा टॅटू त्यांच्या दिवंगत जॅक रसेल टेरियर कुत्र्याच्या स्मरणार्थ काढण्यात आला असून, “प्राणी प्रामाणिक आणि पवित्र असतात. माणसांनी त्यांच्याकडून खूप काही शिकायला हवं,” असं मत त्यांनी व्यक्त केलं.

कल्पना चावलांच्या कुटुंबासोबत तीन महिने-

या मुलाखतीदरम्यान सुनिता विल्यम्स यांनी भारतीय वंशाच्या अंतराळवीर कल्पना चावला यांच्याशी असलेल्या अतूट नात्याबद्दलही भावूक आठवणी सांगितल्या. 2003 मध्ये कोलंबिया अंतराळयान दुर्घटनेनंतर सुनिता यांनी कल्पना चावला यांच्या कुटुंबासोबत जवळपास तीन महिने घालवले होते.

“कल्पनांची आई अत्यंत अद्भुत व्यक्तिमत्त्व होती. तिच्यासोबत आणि कुटुंबासोबत वेळ घालवताना कल्पनांच्या आठवणींना उजाळा देणं मनाला समाधान देणारं होतं,” असं त्यांनी सांगितलं. नासा कायमच कल्पना चावलांचा वारसा जपेल, अशी ग्वाही आपण कुटुंबियांना दिल्याचंही सुनिता यांनी नमूद केलं.

अंतराळातील यश, पृथ्वीवरची झुंज आणि भावनिक नाती या सगळ्यांचा अनुभव मांडत सुनिता विल्यम्स यांची ही मुलाखत अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Tags:##Earth##Space

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
106
Read More →

First-Ever Sunday Budget: Sitharaman to Present on Feb 1

Finance Minister Nirmala Sitharaman will present the Union Budget 2026-27 on Sunday, February 1, marking the first-ever Sunday budget in India.

Jan 9, 2026
61
Read More →

High alert after Trump’s warning, Americans told to leave 14 Nations

Fighting between the United States and Iran has become very serious.

Mar 3, 2026
4
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com
मी चालणंही विसरले होते…; अंतराळात अडकल्यानंतर पृथ्वीवर परतल्यावरची अवस्था सांगताना सुनिता विल्यम्स भावूक - India Morning