विश्वातील ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींचा मानवी जीवनावर परिणाम होतो, असा ज्योतिषशास्त्राचा दावा आहे. २०२६ मधील पहिलं पूर्ण चंद्रग्रहण ३ मार्च रोजी होत असून, या खगोलीय घटनेची चर्चा ज्योतिष वर्तुळात जोरात सुरू आहे. वैज्ञानिकदृष्ट्या ही नैसर्गिक प्रक्रिया असली, तरी श्रद्धा ठेवणाऱ्यांसाठी ती मानसिक आणि भावनिक पातळीवर महत्त्वाची मानली जाते.
यंदाचे चंद्रग्रहण सिंह राशीत आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात होत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे काही राशींवर त्याचा परिणाम अधिक तीव्र जाणवू शकतो. विशेषतः सिंह, मीन आणि कन्या राशीच्या व्यक्तींनी या काळात संयम आणि सावधगिरी बाळगावी, असा सल्ला तज्ज्ञ देतात.
मीन राशी
या राशीच्या व्यक्तींमध्ये अस्वस्थता, अनामिक भीती किंवा कामाचा वाढलेला ताण जाणवू शकतो. अपेक्षित यश मिळण्यात विलंब होण्याची शक्यता आहे. प्रवास, आर्थिक व्यवहार किंवा नवीन ओळखी करताना घाईगडबड टाळणे हिताचे ठरेल. झोपेच्या तक्रारी किंवा मानसिक थकवा जाणवू शकतो.
सिंह राशी
ग्रहण थेट सिंह राशीत होत असल्याने या राशीवर प्रभाव अधिक ठळक असू शकतो. आत्मविश्वास डळमळीत होणे, वरिष्ठांशी मतभेद किंवा निर्णयक्षमतेत संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. आर्थिक गुंतवणूक करताना धोका पत्करू नये. डोकेदुखी, डोळ्यांशी संबंधित त्रास किंवा तणाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कन्या राशी
आर्थिक नियोजन बिघडणे, अचानक खर्च वाढणे किंवा अडकलेले व्यवहार अधिक गुंतागुंतीचे होणे अशी स्थिती उद्भवू शकते. कामाच्या ठिकाणी स्पर्धा तीव्र होण्याची चिन्हे आहेत. कौटुंबिक नात्यांत गैरसमज टाळण्यासाठी संवाद स्पष्ट ठेवणे आवश्यक ठरेल. पचनसंस्था आणि रक्तदाबाशी संबंधित त्रास वाढू शकतो.
तज्ज्ञांच्या मते, ग्रहणाच्या काळात अनावश्यक वाद, जोखीम आणि महत्त्वाचे निर्णय टाळावेत. ध्यान, प्रार्थना किंवा सकारात्मक विचारसरणीचा अवलंब केल्यास मानसिक स्थैर्य राखण्यास मदत होईल. मात्र, प्रत्येकाच्या वैयक्तिक कुंडलीनुसार परिणाम वेगळे असू शकतात, हेही लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

