India Mornings
India Morning
Global News Portal
Friday, April 10, 2026
Loading latest news...
News10 April 20262 views

जनगणना पार्श्वभूमीवर बदल्यांना ब्रेक; ३१ मार्च २०२७ पर्यंत कर्मचाऱ्यांची स्थिरता

T
Tanay
Published in General
जनगणना पार्श्वभूमीवर बदल्यांना ब्रेक; ३१ मार्च २०२७ पर्यंत कर्मचाऱ्यांची स्थिरता

जनगणना तयारीसाठी 31 मार्च 2027 पर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ब्रेक; डिजिटल census साठी स्थिरता ठेवण्याचा निर्णय

देशभरातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत तात्पुरती स्थगिती लागू केली आहे. केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिले आहेत. या निर्णयानुसार ३१ मार्च २०२७ पर्यंत संबंधित कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार नाहीत.

केंद्राच्या या निर्णयामागे आगामी जनगणनेची व्यापक तयारी हे मुख्य कारण आहे. देशात होणारी पुढील जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने पार पडणार असून नागरिकांना ‘स्वयं-नोंदणी’ची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही प्रक्रिया दोन टप्प्यांत राबवली जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात घरांची नोंदणी आणि गृहनिर्माण माहिती संकलन होणार आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०२६ दरम्यान राज्य सरकारांनी निश्चित केलेल्या ३० दिवसांच्या कालावधीत हे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष लोकसंख्या मोजणीची प्रक्रिया फेब्रुवारी २०२७ मध्ये पार पडेल.

सध्या राज्य, जिल्हा, तालुका आणि प्रगणक गट पातळीवर जनगणना कर्मचाऱ्यांची नियुक्ती सुरू असून अनेक ठिकाणी प्रशिक्षणालाही सुरुवात झाली आहे. जनगणना कायदा १९४८ आणि जनगणना नियम १९९० अंतर्गत या अधिकाऱ्यांवर महत्त्वाची कायदेशीर जबाबदारी सोपवली जाते.

यामुळेच, एकदा जनगणनेसाठी नियुक्ती झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांची बदली होऊ नये, असा ठाम आदेश केंद्राने दिला आहे. जनगणना प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी राज्य सरकारांनी तातडीने आवश्यक आदेश काढावेत आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, असेही या निर्देशांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे शिक्षकांसह विविध विभागांतील जनगणना कामात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत त्यांच्या सध्याच्या ठिकाणीच कार्यरत राहावे लागणार आहे.

Tags:#CensusIndia#GovernmentJobs#TransferBan#DigitalCensus2027#StaffStability

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

Jan 14, 2026
61
Read More →

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
133
Read More →

नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरचा पुन्हा दमदार पराक्रम; ‘डबल महाराष्ट्र केसरी’चा किताब पटकावला

पुण्यातील वाघोली येथे पार पडलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव करत मानाची ‘महाराष्ट्र केसरी’ चांदीची गदा जिंकली.

Mar 23, 2026
23
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com