India Mornings
India Morning
Global News Portal
Sunday, April 5, 2026
Loading latest news...
News4 April 20263 views

गिट्टीखदानमधून बेपत्ता मुलाचा भरतवाड्यात मृतदेह; क्रूर हत्येने नागपूर हादरले

P
Puja Nitnaware
Published in General
गिट्टीखदानमधून बेपत्ता मुलाचा भरतवाड्यात मृतदेह; क्रूर हत्येने नागपूर हादरले

गिट्टीखदान परिसरातून बेपत्ता झालेल्या १४ वर्षीय मुलाचा मृतदेह भरतवाडा येथे आढळून आल्याने शहरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागपूर : गिट्टीखदान परिसरातून बेपत्ता झालेल्या १४ वर्षीय मुलाचा मृतदेह भरतवाडा येथे आढळून आल्याने शहरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अथर्व दिलीप नैनोरे या मुलाची निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात असून, त्याचा मृतदेह बोऱ्यात बंद अवस्थेत रिंगरोडलगत टाकून दिला होता.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित मिरवणुकीदरम्यान अथर्व शेवटचा गिट्टीखदान भागात दिसला होता. मिरवणूक संपल्यानंतर तो अचानक बेपत्ता झाला. कुटुंबीयांनी तातडीने शोधाशोध सुरू केली, मात्र काहीच माहिती मिळाली नाही. अखेर पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली.

दरम्यान, भरतवाडा परिसरात संशयास्पद बोरा आढळल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बोरा उघडताच त्यामध्ये मुलाचा विद्रूप अवस्थेतील मृतदेह आढळून आला. हात-पाय बांधलेल्या स्थितीत मृतदेह सापडल्याने हा खून अत्यंत नियोजनबद्ध असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी गिट्टीखदान पोलिस ठाण्यासमोर जमून पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. वेळेत तपास न केल्याचा आरोप करत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू केला असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके कार्यरत आहेत. या धक्कादायक घटनेमुळे नागपूरकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे.

Tags:#Nagpur crime#Missing boy#murder case#Ring Road#Nagpur news

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

नागपुरात तिघांवर कारवाई; रिसॉर्टमध्ये लग्नाची सक्ती; ३ लाखांच्या हुंड्याच्या मागणीमुळे विवाह रद्द!

लग्न निश्चित झाल्यानंतर अचानक अटी बदलत रिसॉर्टमध्येच विवाह करण्याची अट घालून तीन लाख रुपयांचा हुंडा मागितल्याचा प्रकार जरीपटका भागात उघडकीस आला आहे.

Mar 20, 2026
19
Read More →

सायबर फसवणुकीवर नियंत्रण कुठे? २००० कोटी खर्चावर विकास ठाकरेंनी सरकारला फटकारले

सायबर फसवणुकीवर नियंत्रणासाठी खर्च झालेल्या २००० कोटींचा हिशेब काय, असा सवाल आमदार विकास ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केला.

Mar 10, 2026
27
Read More →

उज्जैनहून नागपुरला परतणाऱ्या भाविकांच्या कारचा अपघात; मामा-भाचा ठार, दोघे गंभीर

देवदर्शन आटोपून नागपूरकडे परतणाऱ्या भाविकांवर दुर्दैवी प्रसंग ओढावला. मध्य प्रदेशातील बैतूल-हरदा सीमेवरील ढाकना गावाजवळ त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला.

Mar 20, 2026
8
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com