India Mornings
India Morning
Global News Portal
Tuesday, April 7, 2026
Loading latest news...
News27 March 202614 views

गोंदिया हादरलं! नर्सिंग कॉलेजमध्ये अन्नातून विषबाधा; ३५ विद्यार्थिनी रुग्णालयात दाखल

P
Puja Nitnaware
Published in General
गोंदिया हादरलं! नर्सिंग कॉलेजमध्ये अन्नातून विषबाधा; ३५ विद्यार्थिनी रुग्णालयात दाखल

गोंदियातील नर्सिंग कॉलेजमध्ये अन्नातून विषबाधा; ३५ विद्यार्थिनी रुग्णालयात, प्रकृती स्थिर, तपास सुरू

गोंदिया : शहरातील शासकीय नर्सिंग महाविद्यालयात अन्नातून विषबाधेची गंभीर घटना उघडकीस आली असून ३५ विद्यार्थिनींना अचानक त्रास झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सर्व विद्यार्थिनींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अखत्यारीत असलेल्या या महाविद्यालयात सुमारे १८५ विद्यार्थिनी निवासी पद्धतीने शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयाच्या कॅन्टीनमधूनच जेवणाची सोय केली जाते. बुधवारी रात्री जेवण केल्यानंतर काही विद्यार्थिनींना अचानक पोटदुखी, उलट्या यांसारखा त्रास सुरू झाला.

सुरुवातीला काही विद्यार्थिनींना रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र गुरुवारी सकाळपर्यंत हा त्रास वाढत गेला आणि एकाचवेळी ३५ विद्यार्थिनींमध्ये समान लक्षणे दिसू लागली. त्यामुळे प्रशासनाने तातडीने सर्वांना वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करून उपचार सुरू केले.

घटनेनंतर आरोग्य विभाग आणि प्रशासन सतर्क झाले असून विषबाधेचे नेमके कारण शोधण्यासाठी अन्न व पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे कॅन्टीनमधील अन्नाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून महाविद्यालय परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Tags:#foodpoisoning#gondiaincident#nursingcollege#HealthAlert#studentssafety

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

नागपुरात तिघांवर कारवाई; रिसॉर्टमध्ये लग्नाची सक्ती; ३ लाखांच्या हुंड्याच्या मागणीमुळे विवाह रद्द!

लग्न निश्चित झाल्यानंतर अचानक अटी बदलत रिसॉर्टमध्येच विवाह करण्याची अट घालून तीन लाख रुपयांचा हुंडा मागितल्याचा प्रकार जरीपटका भागात उघडकीस आला आहे.

Mar 20, 2026
19
Read More →

सायबर फसवणुकीवर नियंत्रण कुठे? २००० कोटी खर्चावर विकास ठाकरेंनी सरकारला फटकारले

सायबर फसवणुकीवर नियंत्रणासाठी खर्च झालेल्या २००० कोटींचा हिशेब काय, असा सवाल आमदार विकास ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केला.

Mar 10, 2026
27
Read More →

उज्जैनहून नागपुरला परतणाऱ्या भाविकांच्या कारचा अपघात; मामा-भाचा ठार, दोघे गंभीर

देवदर्शन आटोपून नागपूरकडे परतणाऱ्या भाविकांवर दुर्दैवी प्रसंग ओढावला. मध्य प्रदेशातील बैतूल-हरदा सीमेवरील ढाकना गावाजवळ त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला.

Mar 20, 2026
8
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com